कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करून सरकारने क्रांतीकारक पाऊल उचलले. सरकारच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस स्वागत करत आहे.
खरतरं, तत्कालीन सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला तेंव्हा पासून राष्ट्रवादी युवक काँग्रेस बेरोजगार तरूणांच्या भावनां सोबत होती. आम्ही तत्कालीन सरकारला देखील हा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली होती.
राज्यातील बेरोजगार युवकांच्या या संघर्षाला यश आले याचे समाधान आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस भविष्यात बेरोजगार युवकांच्या मागण्या आणि भावनां सोबत सदैव खांद्याला खांदा लावून लढण्यास कटीबध्द आहे. कंत्राटी भरती रद्द करण्याचा हा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि देवेंद्र फडणवीस जी यांचे आभार आणि धन्यवाद.
श्री.सुरज चव्हाण
(प्रदेश अध्यक्ष
राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश)