समृद्ध गोदाकाठचे जलदूत अजित दादा !!!!!
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व.शंकरराव चव्हाण साहेब यांच्यानंतर मराठवाड्यात जर पाण्यासाठी एखाद्या व्यक्तीने काम केले असेल तर ते अजितदादांनी केले आहे. हे आवर्जून सांगायलाच हवे, लोकनेते अजित दादांच्या दूरदृष्टीतून उभारलेले गोदावरी वरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत, गोदाकाठचा शेतकरी प्रगती करतोय फक्त दादांमुळे, पैठण ते नांदेड या दरम्यान ११ बंधारे जोडून गोदावरीत बारमाही पाणी ठेवण्याची किमया दादांनी पार पाडली आहे.गोदा पट्ट्यातील हजारो हेक्टर जमीन लिताखाली आणून लाखो शेतकऱ्यांना आर्थिक संपन्न करून व नवसंजीवनी देऊन अजित दादा पवार यांनी मराठवाड्याच्या विकासात मोलाची भर घातली आहे. गोदा पट्ट्यातील गावांची जी आर्थिक शैक्षणीक सामाजिक प्रगती झाली आहे त्याचे सर्व श्रेय हे अजित दादांचेच आज या गोदा पट्ट्यात शेतकरी पाण्याच्या मुबलक उपलब्दतेमुळे शेतीमध्ये विविध अत्याधुनीक प्रयोग करून पारंपरिक शेतीला फाटा देऊन अत्याधुनीक शेती करून मोठ्या प्रमाणात पिकांचा उतारा शेतकऱ्यांना मिळत आहे, गोदा पट्ट्यात ऊस शेतीचे प्रमाण जास्त असल्याकारणाने तेथील उसामुळे आजूबाजूच्या साखर कारखाण्याला उसाचा तुटवडा जाणवत नाही आणि याच कारणाने परिसरातील युवकांना या साखर कारखाण्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे. याच कारणाने गोदाकाठचा शेतकरी आर्थिक संपन्न झाला आहे, याचा सिंहाचा वाट हा अजित दादांचा आहे हे कदापी नाकारता येणार नाही, याच भावनेने गोदा पट्ट्यातील शेतकरी कायम अजित दादा प्रति कृतज्ञ आहे. "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" ओळीप्रमाणे त्यांचे कार्य उभ्या महाराष्ट्राला माहित आहे होणारे काम तत्काळ मार्गी लावणे व जे काम नियमबाह्य असेल त्याला तात्काळ नकार देणे हा अजितदादांचा मूळ स्वभाव आणि याचाच अनुभव महाराष्ट्रातील जनतेने वेळोवेळी घेतलेला आहे. याच स्वभावामुळे राज्यातील युवकांच्या मनावर अजित दादा अधिराज्य गाजवत आहेत, शासक कसा असावा याचे उत्तम उदाहरण, राज्यकर्त्यांचे प्रशासनावर नियंत्रण असायलाच हवे आणि ते कृतीतून दाखवून देणारे राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात सर्वात जास्त चर्चेत राहणारे,माती शेती आणि शेतकऱ्यांशी थेट नाळ असलेला नेता, आयुष्यात सर्वात जास्त राजकीय चढ-उतार पाहणारे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री नामदार अजित दादा यांना आई भवानी मातेच्या कृपेने दीर्घायुष्य लाभो व आषाढी एकादशीची विठ्ठलाची महापूजा आपल्या हस्ते घडो हीच प्रार्थना.
श्री.योगेश मोरे
मु.पो.रिधोरी ता.माजलगाव जि बीड.
मो.९५७९४१७७८८